नवी दिल्ली : राजस्थानमध्ये काल रात्री भीषण दुर्घटना घडली. जालौर जिल्ह्यातील महेशपुरा गावांत प्रवाशांनी भरलेली एक बस वीज तारांच्या संपर्कात आली. त्यामुळे बसने पेट घेतला तसेच २० पेक्षा जास्त प्रवाशांना विद्युत प्रवाहाचा जबरदस्त झटका बसला. या भीषण दुर्घटनेत सहा प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सात प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Rajasthan: Six died and seven injured as a bus caught fire after coming in contact with electric wire in Maheshpur of Jalore district, late last night (January 16).
“The injured have been referred to Jodhpur”, said Additional District Collector, Jalore. pic.twitter.com/TCXNVpImqv
— ANI (@ANI) January 16, 2021
जखमींना स्थानिक जोधपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. जालौरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या दुर्घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून, सात गंभीर जखमींना जोधपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याशिवाय अन्य १३ प्रवाशांवर स्थानिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार प्रवाशांनी भरलेली ही बस रस्ता चुकल्याने गावात पोहचली होती. ही बस मांडोलीहून ब्यावरकडे निघाली होती. मात्र रात्री रस्ता चुकल्याने ती महेशपुरा गावात आली होती. त्यानंतर गावातील वीज तारांशी संपर्क झाल्याने बसने पेट घेतला व भीषण दुर्घटना घडली.