विनोद मोहिते
इस्लामपूर – शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनात सहभागी असलेल्या संघटनांच्या सूत्रधारांना अटक व्हावी आणि त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या येथील शाखेतर्फे नायब तहसीलदार सीमा सोनवणे यांना देण्यात आले. या निवेदनाद्वारे पंतप्रधानांनी लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. तपासात होणाऱ्या अक्षम्य दिरंगाई बाबत नाराजी व्यक्त करत तपास प्रक्रिया गतिमान , कालमर्यादित होण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने पंतप्रधानांना आग्रह धरावा अशी मुख्य मागणी केली आहे.
राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे, इस्लामपूर शाखा कार्याध्यक्ष प्रा.बी आर.जाधव,मोहन जाधव, विनोद मोहिते यांनी निवेदन दिले. नरेंद दाभोळकर,कॉम्रेड गोविंद पानसरे , डॉ.प्रा.एम.एम. कलबुर्गी,पत्रकार गौरी लंकेश हे चारही खून एकमेकात गुंतलेले आहेत. यामुळे केंद्रीय आणि राज्य सरकारच्या यंत्रणांचा सुसंवाद होणे आणि संयुक्त कार्यवाही करणे आवश्यक आहे.यासर्व खुनांचा तपास व्यवस्थित होण्यासाठी एक विशेष तपास टीम गठीत करावी, चारही केसेस मध्ये सरकारने निष्णात वकिलांची नियुक्ती करावी, धार्मिक मुलतत्ववादी लोक आणि संघटनांच्यावर बंदी आणावी,सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांचे जीवांचे रक्षण करण्यासाठी एक कडक कायदा करावा या मागण्या आहेत.
निवेदनाचा तपशील असा : विवेकवादी कार्यकर्ते , विचारवंत आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा खून २० ऑगस्ट २०१३ रोजी झाला . या दुःखद घटनेला येत्या २० ऑगस्टला आठ वर्ष पूर्ण होत आहेत . त्यानंतर , डावे विचारवंत आणि राजकीय कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापूर येथे त्यांच्या घराजवळ बंदुकधारी मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली . डॉ नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य फुले , शाहू , आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या सारख्या विचारवंतांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात खर्च करून महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारात भर घातली आहे . आपण एका बाजुला महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे असे म्हणता आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात पुरोगामी विचारवंतांचे खून पडतात हे महाराष्ट्रासाठी नक्कीच भूषणावह नाही.
डॉ. एम एम कलबुर्गी हे महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचे अभ्यासक आणि संशोधक होते तसेच ते हम्पी विद्यापीठ , कर्नाटक चे कुलगुरू होते . साहित्य अकादमीचा २००६ साली त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता . लिंगायत विचारधारेतील ते एक पुरोगामी विचारवंत होते . तसेच त्यांनी अंधश्रद्धांना विरोध केला होता . त्यामुळेच त्यांची धारवाड येथे ३० ऑगस्ट २०१५ रोजी त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या केली . गौरी लंकेश या बेंगलोर , कर्नाटक मधील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता होत्या . गौरी लंकेश पत्रिका नावाचे साप्ताहिकाच्या त्या संपादक होत्या.धार्मिक मुलतत्ववादी,अंधश्रद्धा आणि जातिय भेद यांच्या विरोधी त्या सातत्याने लिहीत होत्या . स्त्री चळवळीत सुध्दा त्यांचा सहभाग असे . या कामांसाठी त्यांना विविध पुरस्कार मिळाले होते. त्यांचा सुद्धा ५ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांचा त्यांच्या घराच्या बाहेर खून करण्यात आला.
आमचा असा ठाम विश्वास आहे की,शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना योग्य वेळी अटक होऊन त्यांच्या खुनाचा तपास , सूत्रधारापर्यंत पोहचला असता तर त्यानंतर झालेले कॉम्रेड गोविंद पानसरे , डॉ.प्रा.एम.एम. कलबुर्गी,पत्रकार गौरी लंकेश यांचे खुन झाले नसते . म्हणूनच आम्ही आजुनही तपासात होत असलेली दिरंगाई आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो.
गौरी लंकेश याच्या खुनाचा तपास करताना तपास करणाऱ्या एस आय टीला असे आढळले आहे की , या चार खूनाच्या मध्ये समान धागा असून परस्पर संबंध आहेच पण या खुनांच्या मागचा हेतू समान असून धार्मिक मुलतत्ववादी या कटात आहेत.
आमचा असा विश्वास आहे की , या मागील मुख्य धार्मिक मूलतत्त्ववादी सूत्रधाराना पकडण्या मध्ये उशीर होत आहे . जे लोक आणि संघटना या खूनांच्या मध्ये गुंतलेले आहेत. त्यांना केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने अटक करणे आवश्यक आहे यासाठी आणि तपासात निर्णायक गती येण्यासाठी विशेष कायदयाची गरज आहे असे आमचे मत आहे . कारण सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक याच्या जीवाला सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक यांचे होणारे खून थांबवण्यासाठी एका कडक तातडीच्या सध्या आपल्या समाजात उघड धोका आहे . असे झाले तर सर्व लोक राज्य घटनेत दिलेला अभिव्यक्ती तपास टीम गठीत करावी लागेल . स्वातंत्राच्या अधिकार उपभोगू शकतील .
या निवेदनावर अंनिसचे डॉ. नितीन शिंदे, डॉ. प्रमोद गंगनमाले, योगेश कुदळे, प्रशांत इंगळे,जितेंद्र व समृद्धी भिलवडीकर,वनिता बनसोडे यांच्यासह पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयाला हे निवेदन मेल करण्यात आले आहे.