जेमतेम एक पाळी सुरू राहिल इतकेच काम
नगर – नगर शहरा लगत असलेल्या एम आय डी सी तील उद्योगांवर शहरातील व उपनगरातील सुमारे 40 हजार कामगारांचे पोट अवलंबून आहे. मात्र आज मंदीच्या परीस्थितीत एमआयडीसी ची स्थिती आणखीनच नाजूक बनली आहे.यापूर्वीच जवळपास 40 टक्के कंपन्या बंद पडल्या असल्याने एमआयडीसीची अवस्था बिकट बनली आहे.त्यातच मंदीचे वातावरण असल्याने परीस्थिती आणखीनच हालाखीची बनली आहे.जेमतेम एका पाळीवरच कारखाने चालू असल्याने कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड पडली आहे. अगोदरच ऑटोमोबाईल्स कंपन्यांवर मंदीचे सावट आल्यानंतर त्यावर अवलंबून असलेल्या कंपन्यां अडचणीत आल्या.
तत्पूर्वी झालेल्या नोटबंदी ,जी एस टी चाही काही प्रमाणात प्रभाव एमआयडीसीतील उद्योगांवर पडला.कमिन्सचे प्रॉडक्शन निम्म्यावर आल्याने त्याचाही परीणाम एम आय डी सी वर झाला.
क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंपनीत झालेल्या 440 कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे 20ते 25 लघुउद्योग अडचणीत आले. त्यावर अवलंबून असलेल्या आणखीन 20 ते 25 उद्योगांवर टाच आली असल्याने त्याचा. परीणाम थेट टेम्पोवाल्यांपासून अन्य उद्योगांवरही झाला. असल्याचे जाणवू लागले आहे.
शिवाय क्रॉम्प्टन ग्रीव्हजच्या व्हेंडर चीही आर्थिक स्थितीही हालाखीची बनल्याने बाकीचे लघुउद्योगही अड्चणीत आले आहेत. क्रॉम्पटन ग्ग्रीव्हज चा प्रश्न तातडीने सुटायला हवा.अन्यथा त्यांचे बाजारात असलेला लौकिक संपुष्टात येईल.त्यानंतर क्रॉम्प्ट्नलाही बाजारात पुन्हा आपली पत सांभाळणे,जम बसविणे अवघड होणार आहे.