नवी दिल्ली – महाराष्ट्रांतील काही किल्ल्यांवर पुन्हा बेकायदेशीर बांधकामे केली जात असून तेथील जुन्या ढाच्यांचे नुतनीकरणही केले जात आहे, हा गंभीर प्रकार आहे त्यावर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि आनंद देवधर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्र सरकारकडे केली आहे. या शिष्टमंडळाने केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही तक्रार दिली आहे.
विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले की कोल्हापुर जिल्ह्यातील विशाळगडावर अशाच प्रकारे अनाधिकृत बांधकाम केले जात आहे. या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या समिती मार्फत तसेच वरीष्ठ सरकारी अधिकारी पाठवून घटनास्थळाची पहाणी केली जावी अशीही त्यांची मागणी आहे.
महाराष्ट्रातील हे जुने किल्ले पुराभितत्व खात्याच्या ताब्यात आहेत. तेथे त्यांच्या अनुमती शिवाय कोणतेही काम केले जाऊ शकत नाही पण महाराष्ट्रातील किल्ल्यांवर त्यांच्या अनुमती शिवायच हे काम सुरू आहे अशी या शिष्टमंडळाची तक्रार आहे.