किव्ह – रशियन फौजा ठरलेल्या शस्त्रसंधीचे पालन करत नसल्याने नागरिकांची सुटका करण्याची मोहीम पुढे ढकलण्यात येत असल्याचे युक्रेनमधील शहर मरीउपोलच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी आपल्या निवाऱ्या ठिकाणी परत जावे, आणि सुटकेसंदर्भात पुढील घोषणेची वाट पहावी असे त्यांनी सांगितले.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार ओलेक्सी अरेस्टोवीच म्हणाले, मुरीओपोल सारख्या सीमावर्ती भागातून नागरिकांचे स्थलांतर सुखरूप होण्यासाठी जाहीर केलेल्या शस्त्रसंधीचे पालन रशियाकडून केले जात नाही. तत्पुर्वी सामरिकदृष्ट्या महत्वाचे बंदर असणाऱ्या मरीउपोलमधून नागरिकांना सुखरूप बाहेर पडण्यासाठी युक्रेनच्या फौजांसोबत शस्त्रसंधीचा निर्णय मान्य करण्यात आला आहे, असे निवेदन रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी प्रसारीत केले होते.
वायव्येकडील मरीउपोल आणि पुर्वेकडील वोल्नोवखा या शहरांमध्ये सकाळी 10 ते आठ वाजेपर्यंत शस्त्रसंधीची मुदत असल्याचे त्यांनी सांगितले. या शस्त्रसंधीच्या काळात मरीउपोल येथून झपोरीझझीया पर्यंत मानवता वादी कॅरीडोर असेल असे एएफपीच्या वृत्तात नमूद केले होते.
सुमारे 500 भारतीय विद्यार्थी खार्किव्ह शहराच्या बाहेर अनेक दिवस खोळंबले आहेत. रेल्वे उपलब्ध होत नसल्याने अनेक विद्यार्थी 11 किमीवरील पिसोचिनमध्ये लटकलेले आहेत. युक्रेनमधील भारतीय दुतावासाने बहुसंख्य विद्यार्थ्यांची सुटका केल्याचा दावा केला असून अन्य विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.
रशियाच्या आक्रमणानंतर शेजारील युरोपीय देशात आश्रय घेणाऱ्या नागरिकांनी रशियाविरोधात कठोर पावले उचलावीत असे आवाहन युरोपीय देशांना केले आहे. या आक्रमणामुळे सुमारे दहा लाख लोकांनी स्थलांतर केले आहे.” आम्हाला नाटोमध्ये सामावून घेणे शक्य नाही, याची आम्हाला कल्पना आहे. पण किमान आभाळ तरी झाका… कारण लोक मरत आहेत.., असे सोलोमिया झीड्रोको या 18 वर्षांच्या स्थलांतरीत युवकाने सांगितले.
रशिया सोडण्याचे ब्रिटीश नागरिकांना आवाहन
जर रशियामध्ये राहणे आवश्यक नसेल आपण उर्वरीत मार्गे तो देश सोडावा, असे आवाहन इंग्लंडने केले आहे. सोमवारी आर्थिक व्यवहार्यता आणि विमानंची उपलब्धता लक्षात घेता रशियाला न जाण्याचा सल्लाही त्या देशाने दिला होता.