पुणे – राज्यात गेल्या आठवडाभरात तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. परिणामी पुण्यासह बहुतांश ठिकाणी उकाडा वाढला असून, नागरिकांनी उन्हापासून सावधता बाळगावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, या भागांमध्ये तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. तर विदर्भात तापमानाने चाळिशी ओलांडली आहे.
विभागातर्फे बुधवारी (दि.21) चंद्रपूर येथे सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तर महाबळेशवर येथे सर्वांत कमी 18 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.