नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या राज्यपालांच्या शिफारशीनंतर आज राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट नंतर ही राज्यात सरकार बनवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे. दरम्यान, मढ आयलंडमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.
- राज्यपालांच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंकडून नाराजी व्यक्त
- राज्यपालांनी ४८ तासांची मुदत न दिल्याबद्दल टोला
- शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा कायम
- भाजप आणि मेहबुबा कसे एकत्र आले? उद्धव ठाकरेंचा सवाल
- वेळ वाढून न देणाऱ्या राज्यपालांवर टीका
- हिंदुत्व आमची विचारधारा आहे
- अरविंद सावंतांना मंत्री पदाचा मोह नाही
- अरविंद सावंत कडवट शिवसैनिक
- युती तुटलीक का? प्रश्नाला उद्धव ठाकरेंची बगल
- आता शिवसेना आणि आघाडी एकत्र बरसतील
- महाराष्ट्रत सरकार बनवणं चेष्टा नाही
- हिंदुत्व आमची विचारधारा
- युती आम्ही नाही तर भाजपनं तोडली
- राष्ट्रपती राजवटीविरोधात याचिका केली नाही.
- जे आमचं ठरेल ते जगजाहीर असेल, लपून छपून काही होणार नाही