नवी दिल्ली – राहुल गांधी आता माजी खासदार झाले आहेत. राहुल यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. मानहानीच्या खटल्यात त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर भाष्य करायला सुरुवात केली आहे. चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला आहे अशी बोचरी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे समजते.
राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल करायला सुरुवात केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत असलेल्या ठाकरे गटाने देखील या निर्णयाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेचे म्हणणे ट्विट द्वारे मांडले आहे.
“चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला आहे. चोर देश लुटणारे आजही मोकळे आहेत व राहूल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत हुकूमशाहिच्या अंताची ही सुरुवात आहे. लढत राहू – उद्धव ठाकरे” अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली.
चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला आहे. चोर देश लुटणारे आजही मोकळे आहेत व राहूल यांना शिक्षा ठोठावली गेली.
लोकशाही चे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत हुकूमशाहिच्या अंताची ही सुरुवात आहे. लढत राहू
उद्धव ठाकरे— Sanjay Raut (@rautsanjay61) March 24, 2023
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, भाजपने त्यांना अपात्र ठरवण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत. जे सत्य बोलत आहेत त्यांना ठेवायचे नाही, पण आम्ही सत्य बोलत राहू. आम्ही जेपीसीची मागणी करत राहू, गरज पडली तर लोकशाही वाचवण्यासाठी तुरुंगात जाऊ.
काय म्हणाले होते राहुल गांधी नेमकं त्यावेळी
Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha.#RahulGandhi pic.twitter.com/ghNC1mWRGu
— Ajay Sehrawat (@IamAjaySehrawat) March 24, 2023