मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवार, 7 डिसेंबर रोजी मंत्रालयात महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्याचे मंत्री, तसेच महाअधिवक्ता उपस्थित राहाणार आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न गेली अनेक वर्षे रेंगाळत पडला आहे. सीमाप्रश्नाचा वाद सद्या सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी तीन वाजता मंत्रालयात बैठक बोलावली आहे.
या बैठकीला मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, मुख्य सचिव अयोज मेहता तसेच महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासह राज्याच्या विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ विधी सल्लागार उपस्थित राहणार आहेत.