मुंबई – भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही तीन मजली इमारत कोसळली या दुर्घटनेवरुन बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे, संजय राउत @mybmc जब मेरा घर ग़ैर क़ानूनी तरीक़े से तोड़ रहे थे, उस वक्त उतना ध्यान इस बिल्डिंग पे दिया होता तो आज यह लगभग पचास लोग जीवित होते, इतने जवान तो पुलवामा में पाकिस्तान में नहीं मरवाए जितने मासूमों को आपकी लापरवाही मार गयी, भगवान जाने क्या होगा मुंबई का 🙏 https://t.co/BBkj8APfnu
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 24, 2020
काय म्हणाली कंगना राणावत
“उद्धव ठाकरे, संजय राऊत…जेव्हा माझं घर बेकायदेशीरपणे तोडलं जात होतं, तेव्हा तितकं लक्ष या इमारतीवर दिलं असतं तर आज जवळपास ५० लोक जिवंत असते.
ती पुढे म्हणाली, तुमच्या निष्काळजीपणामुळे अनेक निष्पाप लोक गेलेत. मुंबईचं काय होणार देवालाच माहित … कंगनाने ट्विटमध्ये महापालिकेलाही टॅग केलं आहे.