मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठायला सुरुवात झाली. आज शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेतला आहे. ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांवर निशाणा साधला.
राज्यपालांनी अनावधानाने हे वक्तव्य केलेलं नाही असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. महाराष्ट्राला रक्त सांडून मुंबई मिळाली आहे, राज्यपालांनी आंदण दिलेली नाही असं देखील ठाकरे यावेळी;इ म्हणाले आहेत. महाराष्ट्राच्याच नशिबी असे लोक का येतात अशी खंत यावेळी बोलताना ठाकरेंनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
मी राज्यपाल पदाचा अवमान करू इच्छित नाही
भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा मान ठेवलेला नाही
कोश्यारींना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज आली आहे
कोश्यारी नावाचं पार्सल घरी किंवा तुरुंगात पाठवा
राज्यपालांच्या ओठावरील वक्तव्य कोणाच्या पोटातलं
हे अनावधानाने आलेलं विधान नाही
राज्यपालांची भाषण दिल्लीतून येतात का ?
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असं वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.