मुंबई: राज्यात स्थापन झालेल्या महविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचा आज विश्वासदर्शक ठराव पार पडला. ठाकरे सरकारने १६९ मतांनी हा ठराव जिंकला आहे. ठराव पार पडल्यानंतर महाविकास आघाडीतील आमदारांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मध्ये प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. बोलताना कडू म्हणाले की उद्धव ठाकरे हे राजकारणातले हरिश्चंद्र माणूस आहेत.
दरम्यान, या विश्वासदारासहक ठरावाला विरोधी पक्षाने जोरदार विरोध केला असून, सगळे नियम, कामकाज धाब्यावर बसवून सभागृहाचं कामकाज सुरू आहे, नियमबाह्य पद्धतीने हे सभागृह सुरू असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदारांनी सभात्याग केला होता.
या बहुमताच्या चाचणीनंतर महाविकास आघाडीच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज विधानसभेत ठाकरे सरकारनं बहुमत सिद्ध केलेलं आहे.