मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनावरून बुधवारी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला. यावर भाजपने आक्षेप नोंदवत भारतीय सैन्याचा अपमान केल्याची टीका उद्धव ठाकरेंवर केली.
भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर म्हणाले कि, चीनसमोर पळ काढे असे निलाजरे विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भारतीय सैनिकांचा अपमान केला. उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत. जवानांचा अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली. तसेच, जनता या ‘राहुल गांधीगिरी’चा समाचार घेईलच, असेही त्यांनी म्हंटले आहे.
“चीनसमोर पळ काढे” असे निलाजरे विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भारतीय सैनिकांचा अपमान केला. उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत. जवानांचा अपमान केल्या बद्दल मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी… जनता या ‘राहुल गांधीगिरी’चा समाचार घेईलच. pic.twitter.com/BeVriQgSrf
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 4, 2021
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना विरोधकांवर टीकास्त्र सोडले. ज्या तारांचे कुंपण सीमेवर असायला हवं ते शेतकऱ्यांच्या वाटेत टाकले जाते. शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे. तिकडे काहीच नाही. हा बंदोबस्त सीमेवर केला असता, चीन देशाच्या हद्दीत घुसला नसता. शेतकरी अतिरेकी आहेत का? असं समजू नका की, देश ही तुमची खासगी मालमत्ता नाही. शेतकऱ्यांची सुद्धा मालमता आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.