मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री ‘उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे’. अशी खोचकी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. या संदर्भातील एक ट्विट त्यांनी शेअर केले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा करण्यासाठी ई-पास काढलाय का ? असा प्रश्न कोपरगाव येथिल आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी मुख्य सचिवांना विचारला. आणि हाच धागा पकडत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणण्याची संधी साधली आहे.
देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 20, 2021
काय म्हणाले निलेश राणे –
“देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे.’ या आशयाचे ट्विट राणे यांनी केले आहे.
दरम्यान, आता निलेश राणे यांच्या या टीकेला शिवसेनेकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. करोनामुळे जिल्हाबंदी आहे मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभर दौरे करत असल्याचे दिसून येत आहे.