मुंबई – उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. तसेच, भाजपाबरोबर पुन्हा युती होणार होती, असा गौप्यस्फोट मंत्री दीपक केसरकर यांनी केला होता. स्वत: उद्धव ठाकरे भाजपाशी हातमिळवणी करण्यासाठी प्रयत्न करत होते, असेही दीपक केसरकरांनी सांगितले.
दीपक केसरकर म्हणाले, भाजपाबरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती होती. या युतीपासून दूर जाणे खुद्द उद्धव ठाकरे यांनाही पटले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देत नव्हते. तरीही भेट घडवून आणली. उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांशी बोलणी झाली. उद्धव ठाकरेंनी कबूल केले की, घडलेले चुकीचे आहे. हे सुधारले गेले पाहिजे. तसेच, भाजपाबरोबर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंनी वचन दिले होते, असा दावा त्यांनी केला.
किरकोळ मतभेद झाले असतील, तर ते मिटले गेले पाहिजेत, हे सुद्धा त्यांना पटत होते. काही वेळ व्यक्तीगत आणि कुटुंबावरील आरोपांमुळे निश्चित दुखावले जाऊ शकतात. पण, दुखावले गेल्यामुळे एवढा मोठा निर्णय, जो आपल्या पक्षाच्या, विचारांच्या विरोधात आहे. हे कितपत योग्य आहे, हे त्यांना सुद्धा पटलेले असावे म्हणून त्यांनी याला मान्यता दिली होती. मात्र, ते घडले नाही. हे का घडले नाही, हे आमदारांना समजून का सांगितले नाही, असा सवाल केसरकरांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय व्हावा – उद्धव ठाकरे
आमदारांचं मत हेच होतं की, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस शिवसेनेला तोडायला निघाले आहेत. यांना शिवसेना संपवायची आहे, महाविकास आघाडीतून बाहेर पडा. कारण, पराभूत उमेदवाराला घेऊन यांची लोकं मतदारसंघात यायची आणि सांगायची की हा उद्याचा तुमचा आमदार आहे. मग शिवसेना टिकणार कशी हा मुळात प्रश्न होता. त्यामुळे कोणीही गद्दारी केली नाही, असं दीपक केसरकरांनी म्हटलं.