मंचर -उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही लढणारी शिवसेना आहे. ती पुन्हा एकदा उभी राहील, असे मत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले . भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त शासकीय पूजेसाठी आले असता माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांबरोबर सवांद साधला.
ते म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा न समजणारा निर्णय आहे. सुप्रीम कोर्टात केस सुरू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह देण्याची एवढी घाई केली आहे.
केवळ उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. मात्र, तरी महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या रूपाने उद्धव ठाकरे यांच्या मागे मोठी ताकद तयार होत असल्याने याची भीती सत्ताधारी पक्षाला आहे.