सातारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात भाजपने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्यावर आज गुरूवारी खासदार उदयनराजे भोसले आपल्या समर्थकांसह शुक्रवारी तातडीने मुंबईला रवाना झाले. उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
त्यांच्यासमवेत माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील काटकर, काका धुमाळ, पंकज चव्हाण, जितेंद्र खानविलकर, संदीप शिंदे इत्यादी उपस्थित होते. सत्ता बदलानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावेळी उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद निवडणुका याशिवाय जिल्ह्यातील विकासकामांबाबत यांनी चर्चा केली.