सातारा: राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून एक मेकांवर राजकीय तोफा डागायला सुरवात झालीये, सध्या अनेक नेत्यांनी सत्तेसाठी पक्षांतर केलं असून त्यांमुळे विकासाचं राजकारण मागे पडत असल्याची खंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. तर नुकतेच राष्ट्रवादीतून भाजप मध्ये दाखल झालेले उदयनराजे भोसले यांच्यावर त्यांनी टीका केलीये. ते म्हणले कि उदयनराजेंच्या रडण्याच्या अभिनयासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कर द्यायला पाहिजे.