मुंबई- सध्या अनेक ठिकाणी परीक्षांसाठी ऑनलाईन काम सुरु आहे मात्र सगळीकडे एकच समस्या सांगितली जाते आहे. ती म्हणजे सर्व्हर प्रोब्लेम. यावर आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये काल जो गोंधळ उडाला तो सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्यामुळे झाला होता. बहिस्थ परिक्षार्थींची संख्या 9 हजार असताना अडीच लाख जणांनी त्यावर लॉग इन केल्याचे दिसत होते. हा सायबर हल्ला असून यंत्रणा कोलमडून टाकण्याचा प्रयत्न होता़.
यासंदर्भात मुंबई विद्यापीठाने पोलीसांकडे तक्रार केली असून अनेक तज्ञ मंडळी याचा शोध घेऊन मुळापर्यंत जाणार आहेत अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली़.
रत्नागिरी जिल्ह्यात आम्ही प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरु करणार आहोत. जिल्हा रुग्णालयात सुरु होणारे हे राज्यातले पहिले सेंटर ठरेल. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरीतही आम्ही ऑक्सीजन प्लान्ट बसवणार आहोत. कोवीड रुग्णांना जी ऑक्सीजनची गरज असते तीच ऑक्सीजनची गरज अन्य रुग्णांनाही असते. त्यामुळे भविष्यात ऑक्सिजन प्लॅन्टचा उपयोग होऊ शकतो, असे मत सामंत यांनी व्यक्त केले़.