उदयपूर – उदयपूर येथील टेलरच्या हत्या प्रकरणातील आरोपींचे पाकिस्तानशी लागेबांधे असल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणात आज आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. तो म्हणजे या प्रकरणातील एक आरोपी रियाझ अख्तरी याने त्याची ज दिुचाकी घेतली होती तिला 2611 हा नंबर मिळण्यासाठी त्याने पाच हजार रूपये जादा मोजले होते अशी माहिती समोर आली आहे.
2008 या वर्षातील 26/11 या तारखेला महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर सगळ्यांत भयंकर दहशतवादी हल्ला झाला होता. त्या अनुशंगाने अख्तरीने ही नंबरप्लेट तयार केली असावी असा कयास बांधला जातो आहे.
कन्हैय्यालाल या टेलरची हत्या केल्यानंतर गौस मोहम्मद आणि रियाझ अख्तरी हे दोघे मारेकरी याच दुचाकीवरून फरार झाले होते.
पोलिस म्हणाले की रियाझने 2611 या नंबरची मागणी केली होती व त्यासाठी जादा पैसेही मोजले होते. त्यामुळेच यातून आणखी काही महत्वाची माहिती मिळू शकते.