डर्बन : सुशांत मिश्रा आणि अंकोलेकर यांनी केलेल्या अचूक मा-याच्या जोरावर भारतीय संघाने १९ वर्षाखालील गटाच्या चौरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत न्यूझीलंडवर १२० धावांनी विजय मिळवला आहे. भारताचा या मालिकेतील तिसरा विजय ठरला.
🇮🇳🆚🇳🇿India U19 have won by 120 runs. #INDvNZ
🇿🇦 🆚 🇿🇼 Zimbabwe U19 won by 31 runs. #SAvZIM
— PitchVision Sports (@PitchVision) January 7, 2020
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद २५२ अशी मजल मारली होती. यामध्ये फलंदाजीत सिध्देश वीरने ७१, तिलक वर्माने ५९, रावतने ३९ आणि हेगडेने नाबाद २६ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत बॅकहॅमने ४७ धावा देत २ गडी बाद केले.
विजयासाठी २५३ धावांचा करताना न्यूझीलंड संघास ३५.५ षटकांत सर्वबाद १३२ पर्यंत मजल मारता आली. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत बॅकहॅमने ५०, टॅशकाॅफने २९ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत सुशांत मिश्राने ३५ धावांत ३, अंकोलेकरने १६ धावांत ३ आणि विद्याधर पाटीलने ३१ धावा देत २ गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले.