ग्रामस्थांनी केली जीवनावश्यक वस्तूंची मदत
यवत – कोल्हापूर आणि सांगलीतील पुरग्रस्तांच्या मदतीला ग्रामस्थ धावून आले आहेत. ग्रामस्थांनी एकत्र येत दोन ट्रक भरून जीवनावश्यक वस्तूंच्या रवाना केल्या आहेत.
पुरग्रस्तांना मदत द्यावी, असे आवाहन शुक्रवारी (दि.9) नागरिकांना करण्यात आले होते, त्यानुसार यवतकर ग्रामस्थांनी काळभैरवनाथ मंदिर येथे जीवनावश्यक वस्तू स्वयंत्स्फूर्तीने आणून दिल्या.
खुटबाव व नाथाचीवाडी येथील ग्रामस्थांनीही मोठे योगदान दिले. साड्या, ब्लॅंकेट, लहान मुलांना कपडे, स्वेटर, चटया, सॅनिटरी नॅपकिन, पिण्याच्या पाण्याचा बाटल्या, फळे, भांडी, किराणा सामान, बिस्किटे, कोलगेट, साबण, दूध, दोन हजार लोकांना पुरेल एवढे तयार जेवण जमा करीत दोन ट्रक भरून या जीवनावश्यक वस्तू पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आज दुपारी रवाना पाठविण्यात आल्या. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शेकडो तरुण पुढे आले असून ते याकामासाठी झटत आहेत.