श्रीनगर – काश्मीरात शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. त्या जिल्ह्यातील कुटपोरा येथे काही दहशतवादी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी तेथे एक संयुक्त ऑपरेशन राबवले त्यावेळी झालेल्या चकमकीत दोन अज्ञात दहशतवादी मारले गेले.
दहशतवादी आणि सुरक्षा जवान यांच्यातील ही चकमक बराच वेळ चालली होती. त्यानंतर त्यात दोन जण मारले गेले. तेथे दोघेच अतिरेकी होते. त्यांना सुरक्षा दलांनी चारही बाजूने घेरले होते त्यामुळे त्यांना तेथून निसटून जाणे शक्य झाले नाही.
ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अजून पटलेली नाही. स्थानिक लोकांना त्यांचे मृतदेह दाखवून त्यांची ओळख पटवली जात आहे. मात्र हे दहशतवादी स्थानिकच आहेत की पाकिस्तानातातून आलेले आहेत हेही अजून समजू शकलेले नाही.