मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह नितीश सारडा आणि फिरोज शेख यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत दिलासा देण्यास नकार दिला आहे. नियमाप्रमाणे जामीनासाठी आधी सत्र न्यायालयात याचिका करावी, असे निर्देश न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना दिले आहेत. यामुळे अर्णब गोस्वामी यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
तर यातच मिळलेल्या माहितीनुसार, अर्णब गोस्वामी तुरुंगात मोबाईल वापरत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे.
दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपाकडून ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे. निषेध आंदोलनं करण्यात आलं आहे.