रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या समुद्रात तिघे बुडाल्याची घटना घडली. यात दोघांचा मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात यश आले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिवाळीच्या दिवशी ही घटना घडल्याने दापोलीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पाळंदे बीचवर महाड येथून आलेल्या आठ पर्यटकांपैकी तीन तरुण बुडाले. त्यातील दीपक सुतार आणि प्रसंजीत तांबे या दोघांचा मृत्यू झाला आहे, तर यश पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आमदार रवी राणांसह 16 कार्यकर्त्यांची दिवाळी तुरूंगात; नवनीत राणांचे तुरूंगाबाहेर धरणे आंदोलन
पाळंदे समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी महाड सुतारवाडी येथील श्रेयश पवार, सोहम सकपाळ, राहुल पवार, सोहम सोंडकर, यश पवार, निखिल कोळंबेकर, प्रसंजीत तांबे, दीपक सुतार हे 8 मित्र शनिवारी पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दाखल झाले होते.
त्यातील सर्व मित्र समुद्रातील पाण्यामध्ये उतरले. परंतु त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यातच आज समुद्राला भरती असल्यामुळे पोहता पोहता या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तीन जण समुद्रामध्ये बुडू लागले.
भारतीयांना शक्यतो करोना लसीची गरज पडणार नाही; ‘एम्स’च्या डाॅक्टरांचा दावा
नेमकं काय होते याचा अंदाज येण्याअगोदरच यातील दोन मित्र दिसेनासे झाले. परंतु काही वेळाने यातील यश पवार भरतीच्या जोरदार लाटेसोबत किनाऱ्यावर आला. त्याला तातडीने स्थानिकांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवले.