इस्लामाबाद : भारतीय जवानांनी दिलेल्या जबरदस्त प्रत्युत्तरात दोन पाकिस्तानी सैनिक ठार झाले. त्याविषयीची माहिती पाकिस्तानी लष्कराकडूनच देण्यात आली. अर्थात, जुन्या सवयीप्रमाणे पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन आधी भारतानेच केल्याचा कांगावा केला.
Indian CFVs along LOC during the last 36 hours. Responding to CFVs, in Haji Pir Sector Pakistan Army troops damaged Indian post killing 3 Indian soldiers including a Subedar, few injured too. In Dewa Sector Naib Subedar Kandero and Sepoy Ehsan of Pak Army embraced Shahadat. pic.twitter.com/yFuBqPgFVv
— DG ISPR (@OfficialDGISPR) December 26, 2019
पाकिस्तानी सैनिकांनी बुधवारी कुरापत काढून भारतीय हद्दीत मारा केला. त्यामध्ये भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याला हौतात्म्य आले. ती घटना जम्मू काश्मीरच्या रामपूर क्षेत्रात नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत घडली. त्या घटनेबाबत पाकिस्तानी लष्कराकडून माहिती देण्यात आली. पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सीमा नाक्याचे मोठे नुकसान केले.
त्यामध्ये 3 भारतीय जवान मृत्युमुखी पडले, तर काही जण जखमी झाले, असा खोटा दावाही पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आला. खरेतर, पाकिस्तानी सैनिकच वारंवार कुरापती काढून भारतीय हद्दीत मारा करतात.
त्या माऱ्याला केवळ चोख प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. भारतीय प्रत्युत्तरात पाकिस्तानी बाजूची मोठी हानी होते. मात्र, त्यातून धडा घेण्याऐवजी पाकिस्तानी सैनिक शस्त्रसंधी भंगाचे सत्र चालूच ठेवतात.