मुंबई – अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी पोलीसांनी आज सकाळी रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी अटक केली. तर त्याच प्रकरणात पोलीसांनी आज सायंकाळी फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना अटक केली आहे.
अन्वय नाईक यांनी सुसाईडनोटमध्ये अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांची नावं लिहिली होती. सुसाईडनोटमध्ये अर्णब गोस्वामी यांनी 83 लाख, फिरोज शेख यांनी 4 कोटी, तर नितेश सारडा यांनी 55 लाख रूपये थकविल्याचे म्हटले होते. ही सुसाईडनोट नाईक यांच्या मुलीने आज पत्रकार परिषदेत माध्यमांना दिली आहे.
पुणे : अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर भाजप रस्त्यावर
अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानेच पतीने आत्महत्या केली, अन्यथा आज ते जिवंत असते, असा आरोप अन्वय यांच्या अक्षता नाईक यांनी केला आहे.
येस बॅंक प्रकरण : वाधवान बंधूंचा जामीन अर्ज फेटाळला
अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ –
पोलिसांचं पथक अर्णब गोस्वामी यांच्या घरी पोहोचल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलीसांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर कलम 353 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे, असे आरोप करत गोस्वामींवर आणखी एक नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.