श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यातील आवंतीपोर क्षेत्रात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. रिपब्लीकन दिनाच्या पुर्वसंध्येला झालेल्या या चकमकीत लष्कराचे दोन जवान जखमी झाले.
तीनच दिवसांपुर्वी येथे शोधमोहीम सुरू केली होती. त्याची चकमक संपल्याच्या एक दिवसानंतर ही चकमक उडाली. हरीपरीगम येथे सुरक्षा दलांनी दहशतवादी असल्याची पक्की खबर मिळाल्यानंतर या परिसराची नाकाबंदी केली.
त्यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. प्रत्यूत्तरा दाखल सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात दोन अतिरकी ठार झाले. ही कारवाई सुरू आहे, असे ट्विट पोलिसांनी केले आहे. या कारवाईत दोन जवान जखमी झाले. त्यांना लष्कराच्या रूग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे