संचारबंदी झुगारत निदर्शक रस्यावर, मंत्र्याच्या घरावर हल्ला, नमावंत आंदोलनात सहभागी
गुवाहाटी : संरक्षण दलांनी पुकारलेली संचारबंदी अक्षरश: धुडकावून लावत हजारो नागरिक येथे रस्त्यावर उतरले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केला. मात्र तरीही निर्भयीपणाने नागरिकांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाला आपला विरोध दर्शवला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आसाममध्ये दोन जण मरण पावले. त्यामुळे तमागरिकत्व सुधारणा कायद्याला (कॅब) विरोधासाठी सुरू असणारे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. आसामचे हातमाग मंत्री रणजीत दत्त यांच्या निवाससथानावर सोनीतपूर जिल्ह्याती बेहाली येथे हल्ला करण्यात आला.
दत्त यांच्या घराबाबहेर निदर्शकांचा मोठा जमाव जमला. त्यांनी दगडफेक सुरू केली. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत लाठीमार करुन आंदोलकांना पिटाळल्याने फारसे नुकसान झाले नाही.
गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालताने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार एका मृत व्यक्तीला आणण्यात आले. तर दुसऱ्याचा मृत्यू उपचार सुरू असताना झाला. मात्र मृतांची ओळख रात्री उशीरापर्यंत पटू शकली नव्हती.
जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी गुवाहाटीच्या लालुंग भागात पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात चार जण जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. याशिवाय पोलिसांनी शहराच्या अनेक भागात गोळीबार केला. गुवाहाटी शिलॉंग महामार्गाला तर युध्दभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते. नागरिकांनी दुकाने आणि इमारतींची नासधुस सुरू केली. जागोजागी टायर्स पेटवले. सुरक्षा दलांशी अनेक ठिकाणी चकमक उडाल्याचरे चित्र होते.
लाटाशील क्रीडांगणावर आसू आणि केएमएसएसने मेळावा निमंत्रीत केला होता. त्याला शेकडोंच्या संख्यने विद्यार्थी आणि तरूण उपस्थित होते. त्यात जूईन गर्ग यांसह अनेक नामवंत सहभागी झाले होते. हे विधेयक मंजूर करून आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या जनतेवर सुड उगवत आहेत, अशी टीका आसूचे सल्लागार समुज्जल भट्टाचार्य यांनी यावेळी केली. या मेळाव्यात या कायद्याच्या निषेधार्थ दरवर्षी 12 दिसेंबर हा काळा दिवस म्हणून पाळण्याचा निर्धार व्यक्त करण्यता आला.
राष्ट्रीय महामार्ग 31 कामरूप जिल्ह्यात रोखण्यात आला. निदर्शकांनी दगडफेक सुरू केल्याने रंगिया तालुक्यात गोळीबाराच्या तीन फैरी झाडण्यात आल्या. अनेक ठिकाणी पोलिसांनी लाठीमार करण्यात आला. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. गुवाहाटी, तीनसुखीया, जोरहाट आणि दिब्रुगढ येथे लष्कराने ध्वचज संचलन केले.