लातूर : मराठवाड्यात कोरोनाने आता आपले हातपाय चांगलेच पसरले आहेत. त्यातच लातूर शहरात बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढतच आहे. त्यात लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात होम क्वारंटाईनवरुन झालेल्या वादातून दोघांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
लातूर जिल्ह्यातल्या बोलेगाव येथील ही घटना आहे. विद्यमान बरमदे हा व्यक्ती बाहेरगावातून काही दिवसांपूर्वी गावात आला. सुरक्षिततेच्या दृष्टीने गावातील तरुण त्याने विलगीकरणात राहावं म्हणून ध़डपडत होते. त्यातील शत्रुघ्न पाटील या तरुणाने त्याला घरातच क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला. पण पुढे त्याचं वादात रुपांतर झालं. त्यात विद्यमान आणि इतर लोकांनी शत्रुघ्न पाटीलच्या वडील आणि पुतण्याला बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. कासार सिरशी पोलिस पुढील तपास करत आहे.