श्रीनगर : पाकिस्तानी सैन्याने सीमेपलिकडून केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात भारतीय लष्कराचे दोन हमाल शहीद झाले तर अन्य तीन जण जखमी झाले, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काम करत असताना हे तोफगोळे त्यांच्यावर थेट आदळले असे त्यांनी सांगितले. सकाळी 11च्या सुमारास ही घटना घडली. पाकिस्तानने उखळी तोफांचा चिथावणीखोर मारा केला, असे या प्रवक्याने स्पष्ट केले.
जखमींना तातडीने रुग्णालयात मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.