नवी दिल्ली – दिल्लीच्या पुल पेहलादपुर भागात आज सकाळी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या जवानांची दोन गुंडांबरोबर चकमक झाली त्यात हे दोन्ही गुंड ठार झाल्याची घटना घडली आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमाराला ही चकमक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. राजा कुरेशी आणि रमेश बहादुर अशी ठार झालेल्या दोन गुंडांची नावे आहेत.
या दोन गुंडांवर खून आणि दरोड्याचे अनेक आरोप होते. पेहलादपूर येथे या गुंडांनी पोलिसांशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ते दोघेही ठार झाले. चकमकीच्या ठिकाणी ते जखमी झाल्यानंतर त्यांना त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यापुर्वीच ते मरण पावले असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या गुंडांविषयीचा अधिक तपशील अजून समजू शकला नाही.