मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा निर्णायक सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियम सुरू झाला आहे. दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी झाली असून आजच्या सामन्यातील विजय मालिका जिंकण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे दोन्ही संघांसाठी करो या मरो अशीच स्थिती निर्माण झालेली आहे.
वेस्टइंडिज कर्णधार कायरन पोलार्ड याने नाणेफेक जिंकत भारतीय संघास फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीने संघात दोन बदल आहे. संघात रवींद्र जडेजाच्या जागी मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे.
3rd T20I. India XI: R Sharma, KL Rahul, V Kohli, S Iyer, R Pant, S Dube, W Sundar, K Yadav, B Kumar, M Shami, D Chahar https://t.co/avPB1DydN0 #IndvWI @Paytm
— BCCI (@BCCI) December 11, 2019
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, मोहम्मद शमी, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार.
वेस्टइंडिज कर्णधार कायरन पोलार्ड याने मात्र मागील सामन्याचा विजेता संघ कायम ठेवला आहे.
3rd T20I. West Indies XI: L Simmons, E Lewis, S Hetmyer, N Pooran, B King, K Pollard, J Holder, K Pierre, K Williams, S Cottrell, H Walsh https://t.co/avPB1DydN0 #IndvWI @Paytm
— BCCI (@BCCI) December 11, 2019
वेस्टइंडिज संघ : कायरन पोलार्ड (कर्णधार), लेंडल सिमंस, एविन लुईस, ब्रैंडन किंग, शिमरोन हेटमायर, निकोल पूरन (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, केरी पेरी, हेडन वॉल्श, शेल्डन कॉट्रेल आणि केसरिक विलियम्स.