धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला
कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर आज पुन्हा वाढलाय. विशेष म्हणजे धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय त्यामुळं राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे आज दुपारी 12 च्या सुमारास उघडले आहेत. स्वयंचलित दरवाजा क्रमांक तीन आणि क्रमांक सहा चे असे दोन दरवाजे एकाच वेळी उघडले असून या दोन्ही दरवाजातून 2 हजार 856 क्यूसेक चा विसर्ग सुरू झालाय .
दरम्यान, पायथा विद्युत गृहातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग यापूर्वीच सुरू असून आज राधानगरी धरणातून एकूण 4256 क्यूसेक चा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. त्यामुळे भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.