औंध (वार्ताहर) – महावितरण कंपनीसाठी औंध येथे काम करणारे वीस कामगार काल (दि. 9) सायंकाळी एसटी बसने भंडारा जिल्ह्याकडे रवाना झाले. गेल्या दीड महिन्यापासून हे कामगार औंध येथे अडकून पडले होते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांना औंध येथून एसटी बसमधून घरी पाठविण्यात आले.
वडूजचे आगारप्रमुख कुलदीप डुबल म्हणाले, खटाव तालुक्यात अडकलेल्या परजिल्ह्यातील व परराज्यातील कामगारांना शासकीय कागदपत्रे, वैद्यकीय प्रमाणपत्रे, जिल्हाधिकाऱ्यांकडून परवाने मिळाल्यानंतर एसटी बसेसमधून त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहे.
मायणीतून राजस्थानला पहिली बस सोडण्यात आली होती. दरम्यान, भंडाऱ्याला पाठविण्यात आलेल्या बसवर चालक म्हणून नितीन भंडारे व बीरू मदने होते. जगदंबा कॉलनीतील युवकांनी या बसवर सॅंनिटायझरची फवारणी केली.