पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2021 मध्ये बारावी परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह दि. 28 जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल.
बारावी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत सोमवारी संपली होती. मात्र, अर्ज भरताना कनिष्ठ महाविद्यालयांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना अर्ज करता आले नाही. त्याचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आली.
नियमित शुल्कासह दि. 19 ते 28 जानेवारीपर्यंत, तर विलंब शुल्कासह दि. 29 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.