मुंबई – छोट्या पडद्यावर लोकप्रिय असेलेली आणि विशेष गाजलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे. या मालिकेमध्ये मध्यंतरी बरेच चढउतार पाहायला मिळाले. या मालिकेत अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने नंदिती वहिनीची खलनायिकेची भूमिका साकारली. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. तिच्या या भूमिकेमुळे मालिकेची रंगत खऱ्या अर्थाने वाढली. मात्र, आता यापुढे मालिकेमध्ये नंदिता वहिनी प्रेक्षकांना दिसणार नाही. लवकरच त्या या मालिकेचा निरोप घेणार आहेत.
दरम्यान, २०१६ मध्ये सुरु झालेली ही मालिका अल्पावधीमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मन जिंकली. मात्र नंदिता वहिनींच्या अभिनयाची आणि त्यांच्या स्टाइलची प्रेक्षकांमध्ये विशेष चर्चा रंगली. या मालिकेमध्ये ज्याप्रमाणे राणादा आणि अंजली या महत्त्वाच्या व्यक्तीरेखा आहेत. तशीच वहिनीसाहेबांचीही आहे. मात्र आता त्या मालिकेचा निरोप घेणार आहेत. धनश्री काडगांवकरने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.