नवी दिल्ली – नुकत्याच सहा राज्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या राज्यांतील निवडणुकांसाठी जी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट मशिन्स वापरण्यात आल्या त्या अजून मतदानाच्या रेकॉर्डसाठी तशाच जपून ठेवण्यात आल्या आहेत. आता येत्या काही काळात उत्तर प्रदेश, वगैरे महत्त्वाच्या राज्यात निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांसाठी ही मतदार यंत्रे व व्हीव्हीपॅट मशिन्स पुनर्वापराला अनुमती द्यावी, या मागणीसाठी निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर निवडणूकविषयक पिटीशन दाखल करण्यास सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिली होती. त्यामुळे या मतदारयंत्रांवरील रेकार्ड जपून ठेवण्याची मुदतही वाढली आहे. तथापि, आता या मशिन्स त्वरित मोकळ्या करून द्याव्यात,असे अशी निवडणूक आयोगाची मागणी आहे.
नुकत्याच आसाम, केरळ, दिल्ली, पदुच्चेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या निवडणुका झाल्या. पण त्या निवडणुकांच्या निकालाबाबत इलेक्शन पिटीशन दाखल करण्याची मुदत वाढवण्यात आल्यामुळे या निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेली सर्व मतदार यंत्रे तशीच जपून ठेवण्यात आली आहेत.
पुढील निवडणुकांसाठी आम्हाला मतदार यंत्रांची गरज असल्याने आम्हाला ती वापरण्याची अनुमती द्यावी,अशी मागणी इलेक्शन कमिशनच्या वकिलांनी कोर्टात केली. त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याचे सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे.