सोलापूर – करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रउत्सवात पहाटे चार ते रात्री दहावाजेपर्यत प्रत्येक दिवशी पंधरा हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच दि. 18 ते 20 ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधी जिल्हाबंदी असणार आहे.
शारदीय नवराञउत्सव काळातील सर्व विधी कुलाचार हे मंहत त्या-त्या विधीचे मानकरी पुजारी यांच्या उपस्थितीत पार पाडले जाणार आहेत. विधी पार पाडताना करोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे, असे आदेश शारदीय नवरात्र उत्सवबाबत जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांना जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही. मात्र लसीकरण न झालेल्या राज्याबाहेरील भाविकांना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासाच्या आतला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आली आहे.
शारदीय नवराञ उत्सवातील अश्विनी कोजागिरी पौर्णिमा दिनी पाच ते सहा लाख भाविक चालत येवुन देविचरणी आपला खेटा पूर्ण करतात. पण यंदा या काळात 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान जिल्हाबंदी, तर तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून तिथे पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी यांचा कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
महोत्सवाची जय्यत तयारी
श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञउत्सव पार्श्वभूमीवर शहरात जोरदार तयारी सुरू आहे. या काळात येणाऱ्या भाविकांना बसस्थानक व वाहनतळातुन थेट घाटशिळ रोडवलरील वाहन तळात यावे लागणार आहे. येथील दर्शन मंडपातुन थेट मंदीराचा दर्शन मंडपात सोडले जाणार आहे. या ठिकाणी सर्वसुविधांयुक्त तात्पुरता मंडप व स्टॉल उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. घाटशिळ वाहन तळात 80 बाय 250 फुटाचे दोन डोम वॉंटरप्रुफ स्ट्रॅंक्चलर मंडप उभारले जात आहे. या मंडपात वीस हजार भाविक थांबु शकतात.