नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड वर्षात “मिशन मोड” मध्ये सरकारी सेवेत 10 लाख लोकांची भरती करण्याचे निर्देश विविध सरकारी विभाग आणि मंत्रालयांना दिले.
त्यावर प्रतिक्रीया देताना भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये एक कोटींहून अधिक मंजुर पण रिक्त पदे आहेत. ही पदे भरण्यासाठी पंतप्रधानांनी अर्थपुर्ण प्रयत्न केले पाहिजेत.
वरूण गांधी यांनी ट्विटरवर लिहिले की, बेरोजगार तरुणांची वेदना समजून घेतल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. नवीन नोकऱ्या निर्माण करण्यासोबतच, 1 कोटींहून अधिक ‘मंजूर पण रिक्त’ पदे भरण्यासाठी आम्हाला अर्थपूर्ण प्रयत्न करावे लागतील. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी वेगाने पावले उचलावी लागतील असे त्यांनी म्हटले आहे.