पुणे : मुस्लिमाना तुरुंगात बंदी करण्यासाठी भाजपने तिहेरी तलाक कायदा केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भालचंद्र मुणगेकर यांनी केला आहे.
ते म्हणाले तिहेरी तलाकला आमचा विरोध नाही, तलाक देणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षाची शिक्षा होणार आहे त्याला आमचा विरोध आहे. ती व्यक्ती तीन वर्ष तुरुंगात राहिल्यास त्याच्या कुटुंबाचा सांभाळ कोण करणार?
भारतात राहणारे सर्व हिंदू आहेत असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते त्यांच्या वक्तव्यावर मुणगेकर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले देशात शीख, बौद्ध, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन आहेत. भगवंत यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे ते म्हणाले.