कोलकाता – पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आज देशभरामध्ये जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. यानंतर आता कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देशातील राज्य सरकारांतर्फे सध्या ‘लॉक डाऊन’ची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र, बिहार, दिल्ली व छत्तीसगड या राज्यांनी उद्यापासून संपूर्ण राज्यामध्ये जमाव बंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय. अशातच तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी कोरोना संकटाच्या काळात संसदेचे कामकाज बंद ठेवण्यात यावे अशी मागणी केली.
याबाबत एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना बंडोपाध्याय म्हणाले, “आम्ही राज्यसभेच्या सभापतींना संसदेच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याचे कळवले आहे. आम्ही, तृणमूलचे खासदार उद्यापासून लोकसभा व राज्यसभेतील कामकाजात सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटामुळे संसदेच्या दोन्ही सदनांमधील कामकाज अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात यावं अशी आमची मागणी आहे.”
We’ve mailed to chairperson of Rajya Sabha that we are not going to attend Parliament session either in Lok Sabha or Rajya Sabha from tomorrow.Let the House be declared sine die. How can Parliament function when the country is in lockdown?: Sudip Bandyopadhyay,TMC MP #Coronavirus pic.twitter.com/S6dFt4sugY
— ANI (@ANI) March 22, 2020