सांगली : सांगली जिल्ह्यात ऑगस्ट 2019 मध्ये ब्रम्हनाळ येथे महापुरात बोट उलटून 17 जणांचा मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणी आंब्याची रोपे लावून श्रद्धांजली वाहण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये महापुराने हाहाकार माजवला होता, त्याच वेळी सांगली जिल्ह्यातिल पलूस ब्रम्हनाळ गावामध्ये अशी एक दूदैवी घटना घडली कि संपूर्ण महाराष्ट्र हळहळून गेला. ती घटना म्हणजे महापुरामध्ये 8 तारखेला जी बोट बुडाली त्यामध्ये 17 निष्पाप लोकांना जलसमाधी मिळाली. आज त्याच ठिकाणी त्या वाईट क्षणाची एक आठवण व अशी पून्हा घटना कधी घडू नये म्हणून जनक्रांती बहुऊदेशीय सेवाभावी संस्था आणि ब्रम्हनाळ येथील नागरिक याच्या वतीने त्या ठिकाणी आंब्याचे रोप लावून एक वेगळ्याच प्रकारची श्रद्धांजली वाहिली.
त्यावेळी प्रशातदादा बंडगर, हेमंतदादा जगदाळे, शिवाजी गडदे, संदीपदादा राजोबा, दिलीप चौगुले, आनंदा कारंडे, अशोक पाटील, सिद्धकुमार वडेर, माधव गडदे, व महिला अध्यक्ष माया गडदे कार्यकर्त्या लता गायकवाड, सुरेखा लोटे, माणिक लोटे, दिपाली जगदाळे, उज्जवला येलावकर, स्नेहल वडेर उपस्थित होत्या.
अशी घटना परत घडू नये, महापूर आपत्तीमध्ये परत असे नूकसान घडू नये व त्यावरती काय ऊपाय योजना करता येतील यासाठी राजकिय सामाजीक, ग्रामपंचायत सर्वांना सोबत घेवून त्याच्या बैठका घेवून सर्वाच्या विचाराने यावरती पाय उपाययोजना करण्याचे कार्य सुरू आहे.