भुईंज – वाई वाठार रस्त्यावरील शांतीनगराच्या ओढ्यावरील पुलावर विद्युतवाहक तार तुटून पडल्याने वाहतूक काही काळ खोळंबली होती. सविस्तर वृत्त असे, वाई वाठार रस्त्यावरील शांतीनगराच्या पुलावर दक्षिण उत्तर अशी विद्युत मंडळाची वीजवाहक तारा जातात त्याच्यातील एक तार अचानकपणे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तुटून रस्त्यावर पडल्यावर वाहतूक ठप्प झाली होती.
चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती वाईचे उपकार्यकारी अभियंता अविनाश खुस्पे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी तातडीने कर्मचाऱ्यांना पाठवून तारा काढण्याचे आदेश देऊन वाहतूक सुरळीत केली.