सातारा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य व्यक्ती केंद्रबिंदू मानून विविध लोकोपयोगी योजना राबवल्या असून त्याचा थेट लाभ खेडोपाड्यातील गोरगरीब जनतेला होत आहे. राष्ट्रीय जलजीवन मिशनमुळे पिण्याचे पाणी प्रत्येकाच्या घरात मुबलक प्रमाणात मिळत आहे. शेतकरी सन्मान योजनेतून जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रूपये थेट बॅंक खात्यात जमा होत आहेत, पंतप्रधान आवास योजना, आयुष्यमान भारत योजना, जनधन योजना, ई- श्रम कार्ड आदीच्या माध्यमातून लाखो लोकांना थेट लाभ मिळत असून पंतप्रधान मोदींमुळे देशाचा कायापालट झाला आहे, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्यावतीने आयोजित सेवा पंधरवड्यानिमित्त कुडाळ (ता. जावळी) येथे झालेल्या रक्तदान शिबिराच्या उदघाट्नप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे, युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्निल ननावरे, अल्पसंख्यांक मोर्चाचे समीर आतार, संदीप परामणे, जिल्हा चिटणीस सयाजी शिंदे, माजी उपसभापती रवींद्र परामणे, बाजार समितीचे माजी उपसभापती जयदीप शिंदे, भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष गीता लोखंडे, भाजप तालुका सरचिटणीस किरण भिलारे, कुडाळचे माजी सरपंच विरेंद्र शिंदे, महेश देशमुख, सुर्यकांत जोशी, महिला उपाध्यक्ष सोनिया धनवडे, कविता धनवडे, युवती अध्यक्ष मोनिका परामने,
रोहित नवसरे, मेढा शहराध्यक्ष विनोद वेंदे, चंदू क्षीरसागर, विठ्ठल देशपांडे, नगरसेवक विकास देशपांडे, गणेश पवार, प्रशांत मोरे, अजय शिर्के, विकास धोंडे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते. रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सेवा पंधरवड्यानिमित्त जावळी तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. त्याचा लाभ सर्वसामान्य लोकांना होत आहे. मोदी यांच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे सर्वसामान्य लोकांची उन्नती होत आहे. पक्षाने टाकलेली सर्व प्रकारची जबाबदारी आपण पार पाडू, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.