मुंबई: मुंबई पोलिसांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पोलीस उपआयुक्तच्या बदल्या 48 तासांच्या आत स्थगित करण्याची सरकारवर नामुष्की ओढविली आहे. 2 जुलै रोजी मुंबईतील 10 पोलीस उपायुक्तांच्या मुंबई अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. तीन दिवसानंतरच या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बदल्या गृहमंत्री व मुख्यमंत्री यांना विश्वासात घेउन केल्या गेल्या. मात्र, या बदल्या करण्याआधी मुख्यमंत्री यांना विश्वासात घेतला नसल्याचा आरोप करत शिनसेना नेते नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेच्या नेत्यांची काही अधिकाऱ्यांच्या नावाला नापसंती होती, जे बदल्यांचे आदेश आल्यानंतर नेत्यांनी मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या
बदल्या रद्द करत नवीन ऑर्डर काढण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंतर्गत बदल्या करण्याचा अधिकार मुंबई आयुक्तांना असतो. त्या अधिकाराचा वापर करत मुंबई आयुक्त परम्बीर सिंह यांनी या बदल्या रद्द केल्या आहेत.
यासाठी गृहमंत्र्यांना ही विश्वासात घेतल्याचे बोलले जात आहे. आपण गृह विभागाला देखील ही माहिती देण्यात आल्याचे समजतेय. परंतु या बदल्यांमध्ये काही अधिकाऱ्यांची नावं अशी होती ज्याच्यावर शिवसेना व कॉंग्रेसच्या नेत्यांनी देखील शंका उपस्थित केली. त्यामुळे या बदल्या थांबवण्यात आल्या आणि बदल्या संदर्भात नवीन आदेश येईपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना आपल्या जुन्या ठिकाणी पोस्टिंगचे आदेश देण्यात आले. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या मुंबई पोलीस उपायुक्तांच्या बदल्या आता रद्द करण्यात आल्या आहेत.