सातारा – गणेशोत्सवासाठी पुणे , मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने सातारा सांगली कोल्हापूर तसेच कोकणाकडे रवाना झाले आहेत. परिणामी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा दिसून येत आहे. त्यातच खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी झाली असून सुमारे तीन ते चार किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
खंबाटकी घाटात इतर ठिकाणी जिथेजिथे वाहतूक कोंडी होत आहे तिथे वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त लावून अवजड वाहनांना तसेच घाटात उभा राहून सेल्फी काढणाऱ्या वाहनधारकांना शिस्त लावण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.