पुणे – डाळ साठा मर्यादा कायद्यामुळे व्यापारी हैराण झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होणार आहे. आता या कायद्यात राज्य सरकारही बदल करत आहे. त्याचाही व्यापाऱ्यांना त्रास होणार आहे. या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी 16 जुलै रोजी राज्यात व्यापाऱ्यांनी लाक्षणिक बंद पुकरला आहे.
या दिवशी राज्यभरातील जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स ट्रेडर्स (महाराष्ट्र)चे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी दिली.
फेडरेशन आणि कॅमिट मुंबई यांच्या वतीने व्यापारी प्रतिनिधींची ऑनलाइन बैठक झाली. संचेती आणि मोहन गुरनानी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये पुण्यासह मुंबई, नाशिक, नागपूर, वाशी, नागपूर, सोलापूर, चंद्रपूर, लातूर, कोल्हापूर, सांगली, नगर, मनमाड, मोडनिंब, दौंडाई, अमरावती आणि नांदेडसह विविध भागांतील व्यापारी सहभागी आले होते.