संगमनेर – अडचणीच्या काळात आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर राज्याची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या काळात पीक अनुदान, पीक विमा, जनावरांसाठी चारा छावण्या याबांबत अनेक चांगले निर्णय झाले होते.
प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सहकारी संस्था सुरू असून, तालुका हा विकासात सातत्याने पुढे राहिला असून, संगमनेर तालुका हा विकासाचा ट्रेड मार्क ठरला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ साकूर, डोळसणे येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बाजीराव पा. खेमनर, शंकरराव खेमनर, इंद्रजित खेमनर, जि. प. सभापती अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, ऍड. सुहास आहेर, सोमेश्वर दिवटे, किरण भिडे, निखिल पापडेजा, जयराम ढेरंगे, पांडुरंग सागर, आनंद वर्पे, अर्जुन घुले, शांताराम कढणे, गौरव डोंगरे, बाळासाहेब गुंजाळ, सिद्धाथ थोरात, संतोष मांडेकर, रमेश नेहे, रविंद्र भोर, शेखर सोसे, विजय पाचकर, रमेश गफले, दिनकर काकड, गोपीनाथ गुंजाळ, बाळासाहेब काकड, सुभाष सांगळे, सचिन खेमनर यांच्यासह नागरिक, युवक उपस्थित उपस्थित होते.
तांबे म्हणाले, सध्या राज्यात बेरोजगारी हीच एकमेव मोठी समस्या असून, यावर मात करण्यात फडणवीस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्य सरकारमध्ये एक लाख 92 हजार इतकी पदे रिक्त असून, मेगा भरतीच्या नावाखाली तरुणांना फक्त फसवले. आ. थोरात यांनी कायम सर्वसमावेशक समाजकारण केले असून, समाजातील सर्व घटकांना समान संधी दिली आहे.
इंद्रजित खेमनर म्हणाले, पठार भागावर आ. थोरात यांनी कायम प्रेम केले असून, वाडी-वस्तीवर विकासाच्या योजना राबविल्या आहेत. वैयक्तीक लाभाच्या योजना योग्य लाभार्थींना पोहचविल्या आहेत. बाजीराव पा. खेमनर, शंकरराव पा. खेमनर यांचीही भाषणे झाली. यावेळी गावोगावी तांबे यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आल्या.