नवी दिल्ली – सप्टेंबर महिन्यात निर्यात 5.27 टक्क्यांनी वाढून 27.4 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. यामुळे व्यापारातील तूट कमी होण्यास मदत झाली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.
मार्च महिन्यापासून भारताची आयात वाढण्याऐवजी कमी होत होती. मात्र, आता परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. निर्यात आणखी वाढावी याकरीता प्रयत्न करण्याच येत आहेत.
सप्टेंबर महिन्यात आयात 19.6 टक्क्यांनी कमी होऊन 30.31 अब्ज डॉलर झाली आहे. त्यामुळे व्यापारातील तूट केवळ 2.91 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात व्यापारातील तूट 11.67 अब्ज डॉलर होती. सप्टेबर महिन्यात सोन्याची आयात 52 टक्के कमी झाली असल्यामुळे व्यापारातील तूट कमी होण्यास मदत झाली आहे.